iqbal pul malegaon jamav

मालेगाव : इकबाल पुलावर प्रतिबंधक क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले आणि तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती , पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना जाण्यास सांगितले तेव्हा जमावाने पोलिसांवरच धाव घेतल्याच समोर आल आहे .  पण परिस्थिती बिघडताना पाहून अधिक पोलीस कर्मचारी घटनास्थळी जमले. जमावाला आवरणं शक्य झालं.




सूत्रांनी दिलेल्या माहितीअनुसार लोक लॉकडाऊनमुळे अस्वस्थ होऊन  पुलावर  जमायला लागल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी ऐकले नाही आणि सुरक्षा कर्मचार्‍यांवर दगडफेक केली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याचं पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे अनेक स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.


लॉकडाऊनमुळे अनेक समस्या निर्माण झाले आहे यात मालेगावमधील या लोकांपर्यंत सरकारच्या सोयी-सुविधा आणि अन्नपुरवठा पोहोचला नाही व त्यात  हातावर पोट असणाऱ्यांचं काम बंदं झाल्यामुळे हे लोक आपल्या हक्कासाठी एकत्र आले. त्यामुळे मालेगावमध्ये एकत्र येत लोक आक्रमक झाले हे खरं आहे.  

जे लोक जमा झाले होते त्यांना अनेक दिवसापासून अन्नपुरवठा मिळत नाही आहे , त्यात एकाच घरात अनेक लोक राहतात त्यांच्या खाण्याची व्यवस्था होत नाही आहे , प्रशासनाकडून वारंवार आश्वासनं देऊनसुद्धा इथे मदत पोहोचत नाही. त्यामुळे इथला जमाव पाहता त्यांच्यापर्यंत आवश्यक गरजा पोहोचणं महत्त्वाचं आहे.


मालेगाव मध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 101 वर आहे. या पाश्वभूमीवर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे , व अन्नपुरवठा व्यवस्तीत केला पाहिजे अशी मांगणी होत आहे.

महाराष्ट्रातील मालेगावमध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 101 वर आहे. गुरुवारी 5 नवीन प्रकरणे समोर आली. मालेगाव हा महाराष्ट्रातील रेड झोनमध्ये येतो. कोरोना संक्रमणामुळे झालेल्या 269 मृत्यूंसह सर्वाधिक 5,652 संक्रमित रुग्ण महाराष्ट्र आहेत.